गुलाबी थंडीत

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास....

मला कुणी सांगेल का

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

फक्त तू

तो delete करणारी तू...
माझा call पाहता,
तो cut करणारी तू...
मी समोर दिसता,
... मला न पहिल्या सारखं करून,
पुढे निघून जाणारी तू...
अन,
पुढे गेल्यावर,
हळूच मागे वळून,
मला पाहणारी तू...
आपल्या breakup नंतर,
आपल्याच मित्रान मध्ये,
मला विसरण्याचा प्रयेत्न करणारी तू...
अन,

कोणी माझ्या बद्दल काही विचारलं तर,
फक्त गप्पा राहणारी तू ...
माझी आठवण,
आल्यावर चोरून रडणारी तू...
आणि,
जगा समोर गोड गोड हसणारी तू..
रोज मला पाहून,
न पहिल्या सारखा करणारी तू...
अन,
माझ्या हातात सिगारेट पहिली कि,
"सिगारेट तक खाली,
आणि घरी जा... "
असं,
फोने करून बजावणारी सुधा तूच....
प्रेम असून हि,
नाही असं भासवणारी तू...
अन,

breakup नंतर सुद्धा,
माझ्या वर जीवपार,
प्रेम करणारी तू...
माझ्या वर जीवपार,
प्रेम करणारी तू.





कळत नाहीत वाटा,

कळत नाहीत वाटा,
तिकडे कशाला जायचं..?
आपले नव्हते जे,
त्यांना का आठवायचं..?

ज्यांना विश्वास कधी,

समजला नाही..
त्यांना का आपण,
खास काही सांगायचं..?

आहेत आपल्याकडे 

शब्द मांडायला,
न ऐकनार्यांसाठी,
का ओरडायचं..?

भावना आहेत मनी,

त्यांना फक्त मांडायचं,
आपला काही चुकतं,
म्हणून गप्प का राहायचं..?

नाही सापडलं उत्तर,

तर प्रश्नांना नाही टाळायचं,
जगासमोर एक,
आपलं उदाहरण ठेवायचं..!!


 विरहात जगून काय सिद्ध करू पाहताहेत ? तुमचं प्रेम किती महान होत ते ? प्रेम म्हणजे एका वाहत्या नदी प्रमाणे असतं.. प्रवाहात नेहमीच पुढे वाहत असतं.. एका ठिकाणी थांबलं तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं.. ..आणि पुढे सरकत राहिलं तरच सागराशी मिळतं..... 

जेव्हा काही चुकत असेल

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......

तुला आठवेल बरोबर असलेल....

जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........

तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....

जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........

मी येईल वाऱ्‍याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला........ ..

जेव्हा तू झोपला असेल.........तेव्हा माझीआठवण कर........

मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला....... ..

जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर........

मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला........ .

जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......

मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......

कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....

माझ तस अस्तिव हि नाही......

पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....

तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....

तुझे अश्रू बनून......

तुझ्या वेदना घालवायला....... ♥♥♥

कोंबडी कोणी पळवली…


##  नेत्यांच्या स्टाईलने…………….
महात्मा गांधीकोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.
लोकमान्य टिळककोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय?
बाळासाहेब ठाकरेजर कोंबडी वापस मिळाली नाही तर, त्या कोंबड्याला [चोराला] पहाटे आरवायला लावू. हे कोंबडी चोराने हे लक्षात ठेवावं.
राष्ट्रपती ताईकोंबडी चोरीला जाणे ही अतिशय वेदानादेह घटना आहे. मी ह्या घटनेचातीव्रशब्दात निषेध नोंदवते.
मनमोहन सिंगकोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.
पी. चितंबरम- यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.
दिग्विजयसिंहकोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.
अण्णा हजारेजर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी पुन्हाआमरण उपोषणालाबसेन.
रामदेवबाबाकोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?
अटलबिहारी वाजपेयीकोंबडी पळवणे……… ही........ चांगली गोष्ट नाही...... मी सरकारला……. अनुरोध...... करेन की……. त्यांनी लवकरात लवकर……. त्या कोंबडी चोराचा छडा....... लावावा.
अजित पवारमी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.
लालू प्रसाद यादवअरे मुर्गी थो चोरी हुई है ! मिल जायेगी|भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी||
राज ठाकरेजर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
उद्धव ठाकरेगेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक खुपसू नये.
आर आर पाटीलमोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये.
राहुल गांधीकोंबडी चोर कोण है? महाराष्ट्रीयन है|
बराक ओबामाओह नो! आय कांन्ट..
नारायण राणेहिम्मत असेल तर कोंबडी चोराने मालवणात येऊन दाखवावे.
मायावतीकोंबडी पळवणे हे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे.
नितीन गडकरीकोंबडी चोर हा काय सरकारचा जावई आहे?

डिव्होर्स हवाय !!!

दारावरची बेल वाजते. एक तरुण पुरुष दार उघडतो... तरुण स्त्री अत्यंत वैतागून आत येते.
दार लावून घेते. तो परत जे काम करत असतो त्यात गर्क होतो. ती बसून राहते , थोडा वेळ शांतता.

...

ती : मला डिव्होर्स हवाय....

तो : काय झालं ?

ती : आताच्या आता.... ताबडतोब मला डिव्होर्स दे.

तो : पण का ?

ती : मग तरी निदान - डिव्होर्सच्या धक्क्यातून सावरायला मी कुठेतरी लांब जाऊ शकेन दुख , यातना विसरण्यासाठी ... कुठल्यातरी अभयारण्यात एकटी फिरेन. ना ही गर्दी असेल ना ट्रॅफिक जॅम. तुला माहितीये , चर्चगेट टू अंधेरी फास्ट ट्रेनने बरोबर ३५ मिनिटांत पोहोचले पण अंधेरी टू घर , दीड तास. इतका ट्रॅफिक जॅम होता की मी बसमधून उतरले नि चालू लागले. रस्ते पण इतके घाण झालेत आणि... आणि सतत कुठून तरी कोणी तरी थुंकत असतं. स्वत:ला बचावत कशीबशी पुढे आले , रिक्षा केली तर रिक्षावाल्यानेही फसवलं. सगळे फसवतात रे आपल्याला. आपण टीव्ही नाही घेतला , आपल्याकडे गिझर नाही तरी इलेक्ट्रिकचं बिल भरभसाट , मोबाइलवर पण कामापुरतं बोलूनही भयानक बिल. ते वाचलंस ना दुधात भेसळ , भाज्यांना केमिकल्स लावून हिरवं करणं - मला राग येतोय. त्यात आपली लिफ्ट बंद होती. मेण्टेनन्स कशासाठी भरायचा मग... मला डिव्होर्स दे किंवा दूर कुठेतरी घेऊन चल , कंटाळा आलाय - रोज तेच तेच...

तो : चल आताच्या आत निघू जी ट्रेन मिळेल त्यात बसू जिथे वाटेल तिथे उतरू कोणाहीकडे राहू दोन दिवस मुक्काम परत खांद्यावर शिदोरी घेऊन पुढे जाऊ रात्रभर तारे बघू , शेतात फिरू , उन्हात रापू , दिवसभर समुद्रकिनारी पहुडून राहू...चल.

ती : खरंच जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं - असंच असावं ना आयुष्य.

तो : आर यू शुअर तिथे गेल्यावर गावात फिरताना कुठल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल
आपल्या कानावर येणारच नाही ? समुद्रातही किती प्रदूषण वाढलंय दिसणारच नाही
आपल्याला - म्हणजे आपण अगदी ठरवलं तर कदाचित नाही कळणार. आपल्याला सगळे
सेन्सेज बंद करायची सवय तर लागलीच आहे म्हणा...

ती : बघू तू परत मला निराश करतोयस. मला माहितीये सगळं वास्तव भयाण आहे.
पण एखादी वा-याची झुळूक कावळा , चिमणी , कबूतराव्यतिरिक्त एखादा पक्षी दिसणं ?
जाऊ देत काहीच शक्य नाही - आणि रोजची पैसा मिळवून देणारी कामं सोडून जायची
धमकही नाहीये रे - उद्या माझं प्रपोजल सँक्शन होईल का ? आज बॉस खुश झाला - बास्स एवढंच आयुष्य...
म्हणून मला एखाद्या मोठ्या धक्क्याची गरज आहे - दे ना रे डिव्होर्स मला किंवा एखादं अफेअर कर...

तो : चहा घेतेस ? नाही मस्त लिंबू सरबत करतो तुझ्यासाठी - फ्रेश वाटेल. मग बोलू अफेअरबद्दल...

( ती हसते - हळूच त्याला मिठी मारते)

ती : चल परत पळून जाऊ या...

तो : उद्या बघू...

love letter


एक होता चिमना आणि एक होती चिमणी

एक होता चिमना आणि एक होती चिमणी
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार
तरीही एकमेकांचे जिवलग यार.

वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .

चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित,
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत

रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही मनात असू देत अशाच काहीशा भावना

एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले

त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते

का “नाही” ह्याची बरीच कारणे सांगितली
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात नाही पटली

चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना

चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला

चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता

चिमणीने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले

एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते

एक प्रश्न मात्र तिला आयुष्यभर सतावत राहिला
चिमण्याच्या डोळ्यात तिला दिसलेले प्रेम हा नुसता "आभास" कसा ठरला?

प्रेमात पडल की असच होणार

प्रेमात पडल की असच होणार....! दिवस
रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन
उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणार तुमच काय, माझ
काय,
प्रेमात पडल की असच होणार! डोळ्यात
तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चादंणे
साण्डणार
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग; तीच्यापुढे
फ़ीका वाटणार तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
तीच्या फोनची आपण दिवसभर वाट
बघणार,
मित्रान समोर मात्र
बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सारा राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
मेसेजनी तीच्या inbox आपला भरुन
जाणार्,
तीचा साधा MSG सुध्दा आपण जतन
करुन ठेवणार्,
प्रत्येक sent MSG पहिला तीलाच
forward होणार,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार....

शेंगदाणे

पांडू हवालदाराने चार
शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
झाले.
त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
'' अहो,
या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
केला.''
...
इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्न्
पडून इ.
प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला.
पहिल्या पोराला विचारलं, ''तुझं नाव
काय
आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास
राणीच्या
बागेत?''
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला, ''माझं नाव नन्या.
मी
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न
करत होतो.''
आता
दुसरा मुलगा. ''माझं नाव मन्या.
मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे
टाकायचा प्रयत्न
करत होतो.''
तिसरा मुलगा. ''माझं नाव विन्या. मी
पण
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत
होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला, ''माझं
नाव
शेंगदाणे!!!!''

आज मी तिला सगळ सांगणार होतो

आज मी तिला सगळ सांगणार होतो,
मनातील घुसमट अलगद मांडणार होतो..
प्रेमात वेडेपणाची मर्यादा मी आज तोडणार होतो,
वाटले होते प्रेम व्यक्त करावं..
तिच्या सहवासात मनसोक्त जागावं,
तिला माझ्यात सामावून घ्यावं..
आणि स्वतः तिच्या हवाली व्हावं,
पण रात्रभर मी विचार केला..
जर ती नाही म्हणाली तर..?????
प्रेमाचा स्वप्नमहाल बनण्या आधीचं,
कोसळला तर..?????
असे वाटते तिच्या मनात काय आहे,
याची चाहूल घ्यावी
तिलाही प्रेम व्यक्त करण्याची,
एक संधी द्यावी..
मला ती आवडते हा माझा स्वार्थ आहे,
तिला मी आवडत नसेल कदाचित..
तिचा विचारही सार्थ आहे,
म्हणून मग मी ठरवले
काहीच बोलायचे नाही..
प्रेम गमवावे लागले तरी चालेल,
पण..?????
मैत्री गमवायची नाही..

लोक लग्न का करतात

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या
मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का
करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे
अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं
असतं  का?

जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला
लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत
असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड  पॉकेट मनी
आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.

नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग
वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा
प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत
नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग  जर मुलगी असेल तर आई
वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं
हिला असं? आता लवकर  उजवून  टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण
सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते.
स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या
इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू
लागतात.

मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन
तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून
येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,”
काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई
बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं
लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.

इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही
लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून
आपणही  करायचं का?  सोशल अ‍ॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या
सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की
आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं
म्हणजे  आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय
करायचं?

तिच्याही मनात साधारण असेच  विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी
मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे
रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का??

दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण  हिम्मत दोघांचीही
होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते.
मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते
ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी
बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती
मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा
येडा’ कधी काही बोलतो का ह्याची!

पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं,
आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत
असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको?  बरोबरच्या मित्रांच्या पण
लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही
प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की
ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र   ढीम्म पणे
बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.

असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं
अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते.  मधल्या काळात ,  एक तर  तिचे लग्न
ठरते किंवा  तिला कोणी  पसंत पडलेला  नसतो  .

हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं?
हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण
पणे मुलांच्या  जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही
लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने
मन तयार करत असतं.

****

लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत
असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती   ्दुसरया कोणाशी तरी
लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग
नेहेमी साठी तिच्या  बरोबर रहायला  हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !

दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार
किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट
करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच
आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात.

काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न
करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात,
आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे
फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते,
तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये
आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना?

पण याच गोष्टीवरून एक  लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली,
तरीही समाजातलं अ‍ॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल
का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे
पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.

काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे  सगळे
लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष
केल्यावर ,  आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची
इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त
पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.

बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या  एकटेपणातुन बाहेर
पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं
यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते   शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि
मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते.
अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.

अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो,
आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं
असतात.

दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते,
जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर
रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!!

धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न
रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.

या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे
तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर
बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला.  सेक्स हा पण  उद्देश आहेच. पण
केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न
केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे.   सेक्स साठी म्हणून कोणी
लग्न करत नाही.

जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा
राजकुमार, विजय मल्या,   वगैरे की ज्यांनी मनात आणले  आणि त्यांनी फक्त
हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील.
 त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच
मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या
बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत
नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.

जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे
बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची  बायको , अमिताभची सून, त्या बाळाची
आई.. इतके काही झाली लग्नानंतर.  हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो
मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.

   सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे,
ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .

   जर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं?  हे   आठवुन बघा,
आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून
पहा….  जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा… :)

तुला सोडुन जान्याची खंत नेहमीच मला सतावत जाईल

तुला सोडुन जान्याची खंत
नेहमीच मला सतावत जाईल ।

खुप काही दिलं आणि
खुप काही घेवून जाईल ।

आठवणीँचे ओझे वाहून
नेताना सुखाचे मोती देवून जाईल ।

अश्रु नकळत टिपताना तुझे
मी ओठावर स्मितहास्य
सोडून जाईल ।

शिजविताना भविष्याचे
निखारे मी भुतकाळाला
स्मरत जाईल ।

जाता-जाता एकदा तुला
डोळेभरुन पाहून जाईल ।

एकांतात तूझेच शब्द मी
पुन्हा-पुन्हा गिरवत जाईल ।

जवळ होतो जेव्हा, तेव्हा
कदर नव्हती माझी मी
खुप-खुप दुर नीगून जाईल ।

विसरने मला, नाही होनार
शक्य तूला मी एकांतात
तूला रडवत जाईल ।

डोळे ओलावतील तूझे,
माझी कुशी तूला आठवत जाईल ।

मी जवळ नसेल तुझ्या पण
माझा आभास तूला सतावत जाईल ।

व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन

तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर
क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे
च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो )
पुढे ...
तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून
जाईन .
तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस
आणि तू
मला झिडकारतेस ,
खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम
करतेस ?
ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास
दिवसाची गरज असते?
माझे तूझ्यावर प्रेम असते तर ,
तूला जायाला सांगीतले नसते
तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस ,
ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस
ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत
दिसते,
तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण
येते
तो - मग रोज घरी जाताना मागे
का वळ्तेस ?
सारखं मागे वळुन मला का पहातेस?
ती - मला मोकाट
सोडलेल्या कुत्र्यांची खूप
भिती वाटते
म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते
तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान
मी सहण
करणार नाही ,
आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार
नाही
ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून
आनंद
झाला,
पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज
वेळ
कसा वाया गेला?
तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते
असलेली लिस्ट काढून )
ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे
या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे
आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार
एक -दोघींचा तरी होकार
मला नक्की मिळणार
ह्या दिवसाचा एक =एक क्शण
माझ्यासाठी अनमोल आहे
तूझं माझ्यावर प्रेम आहे का?
या सर्वांना विचारायचं आहे
ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,
जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल
( दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू
लागतात . इतक्यात तिला आवाज
येतो व्हिल यू
बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच
असतो. खुप
राग आला असताना ही ती नकळत तो जवळ
येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच
तो तिच्या हातावर
नावांची यादि असलेला कागद ठेवतो.
ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...
ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त
माझेच
नाव आहे .
मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?
तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत
आहेस
मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं
आहे .
(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू
लागतो ..
थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो ..
व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने
वळुन
पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत
त्याला विचारते ... व्हिल यू बी माय
व्हेलेंटाईन